vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

मुंबई प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील राजूर येथून आदिवासी शेतकरी, अर्धवेळ परिचारिका, पोषण आहार तयार करणारे मदतनीस व कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. लाॅग मार्च संगमनेर पर्यत आला असून, त्यांच्या प्रश्नांची दखल घेत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संबंधित मागण्यांवर सखोल चर्चा होऊन बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आले. तसेच, उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही आश्वासित करण्यात आले. तसेच, शासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेत आदिवासी व कामगार बांधवांच्या न्याय्य मागण्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ठाम विश्वास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आंदोलनाचे नेते आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, नंदू डहाळे, हेमलताताई शेळके, कल्पनाताई धनवटे, रंजनाताई पर्हाड, वैशालीताई सुरसे यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

000000

 

संबंधित पोस्ट

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.