vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

मुंबई प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील राजूर येथून आदिवासी शेतकरी, अर्धवेळ परिचारिका, पोषण आहार तयार करणारे मदतनीस व कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. लाॅग मार्च संगमनेर पर्यत आला असून, त्यांच्या प्रश्नांची दखल घेत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संबंधित मागण्यांवर सखोल चर्चा होऊन बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आले. तसेच, उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही आश्वासित करण्यात आले. तसेच, शासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेत आदिवासी व कामगार बांधवांच्या न्याय्य मागण्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ठाम विश्वास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आंदोलनाचे नेते आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, नंदू डहाळे, हेमलताताई शेळके, कल्पनाताई धनवटे, रंजनाताई पर्हाड, वैशालीताई सुरसे यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

000000

 

संबंधित पोस्ट

रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन* 

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेमलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न..

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इंगोले नगरमधील नागरिकांना जागेची सनद बहाल स्वमालकीची जागा असल्याची सनद मिळाल्याने पट्टेधारकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत विशेष मोहीम

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले