vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक

हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र हे पानझडी जंगल (Deciduous Forest) स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे येथे हिवाळयाच्या कालावधीत काही झाडांची पानगळती होऊन त्या झाडांना कालांतराने नवी पालवी फुटत असते.

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात निरनिराळया जातीची वृक्षसंपदा मोठया प्रमाणात आहे. त्यामधील काही झाडांची पानगळती विशिष्ट ऋतूनुसार होताना दिसून येते. या पानगळतीबाबत पर्यावरणप्रेमी, समाजसेवक, पत्रकार, वृक्षप्रेमी, नागरिक यांच्याकडून विविध माध्यमांतून चिंता व्यक्त होताना दिसून येते.

          वास्तविकत: हिवाळयात झाडांची पाने गळणे ही अत्यंत नैसर्गिक आणि महत्वाची प्रक्रिया आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. याला शास्त्रीय भाषेत पर्णपात (Abscission) असे म्हणतात. हिवाळयात झाडांमध्ये ऐबासीसिक ॲसिड नावाचे संप्रेरक तयार होते. यामुळे फांदी आणि पानांच्या देठांमध्ये एक पातळ स्तराची भिंत तयार होते. या स्तरामुळे पानाला मिळणारे पाणी आणि पोषक तत्त्वे थांबतात आणि पाने सुकून खाली पडतात. मात्र काही कालावधीनंतर या झाडांना नवी पालवी फुटते.

          नवी मुंबई महानगरपालिका उदयान विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वृक्षांची वेळोवेळी योग्य ती निगा राखली जाते. ऋतुमानानुसार निसर्गत:च होणारे बदल समजून घेऊन निसर्गाच्या विविध बदलांचे स्वागत करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा, आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांची कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी देण्यासाठी नियोजन करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे