vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

 

जालना, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांच्या व्यवसाय विस्ताराला चालना देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्योजक मेळावा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि.24 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जालना यांनी केले आहे.

स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म उद्योजकांना अनेकदा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, उद्योजकांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या सत्रात दे आसरा फाउंडेशनचे तज्ज्ञ आणि जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार असून, नेटवर्किंग वाढवण्यासाठीही ही मोठी संधी ठरणार आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी https://forms.gle/DtPKMVVk2E3GmKBc7 या लिंकवर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

लखनऊच्या CCS आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIने १५.४६ कोटींचं हाय-ग्रेड हायड्रोपोनिक गांजा (१५.४६ किलो) जप्त  बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून व्हॅक्युम-पॅकिंगमध्ये लपवलेला गांजा सापडला. पुढील तपास सुरू आहे.

पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍तआमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश..

कठोर परिश्रम आणि कौशल्य हाच यशाचा खरा मंत्र – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन