vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

 

बुलढाणा: प्रतिनिधी जिल्ह्यातील दूध उत्पादन, दुधाचा वापर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतील ताळमेळ तसेच भेसळयुक्त पदार्थांच्या वाढत्या तक्रारींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेसळयुक्त पदार्थ विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक आणि पुरवठादारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

अलीकडच्या काळात बाजारपेठेत पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडरचा वापर करून तयार केलेला पदार्थ ‘खवा’ म्हणून, तर पाम तेलापासून बनवलेले ‘चीज अ‍ॅनालॉग’ हे ‘पनीर’ म्हणून विकले जात असल्याचे समोर आले आहे. हे पदार्थ प्रामुख्याने गुजरात राज्यातून १० किलोच्या बॅगांमध्ये ‘स्पेशल बर्फी’ किंवा प्लास्टिक डब्यांमध्ये ‘हलवा’ या नावाने येतात. नियमानुसार, असे पदार्थ विकताना ते पाम तेल व मिल्क सॉलिडपासून बनवलेले आहेत, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक विक्रेते छुप्या पद्धतीने याची विक्री करत असून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई विक्रेत्यांनी आपल्या मेनू कार्ड किंवा फलकावर अशा पदार्थांची स्पष्ट माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल, घटक आणि प्रकार नीट तपासावेत. कोणत्याही संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे किंवा १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

जीवनात अपयशाने कधीही खचून न जाता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

धारावी टी जंक्शन तपासे चौकातील हम सब एक है शिल्पाची देखभाल करा, फेस कॉम संलग्न धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

शबरी घरकुल योजनेतून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्याचा निर्धार   — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन