vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

 

बुलढाणा: प्रतिनिधी जिल्ह्यातील दूध उत्पादन, दुधाचा वापर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतील ताळमेळ तसेच भेसळयुक्त पदार्थांच्या वाढत्या तक्रारींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेसळयुक्त पदार्थ विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक आणि पुरवठादारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

अलीकडच्या काळात बाजारपेठेत पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडरचा वापर करून तयार केलेला पदार्थ ‘खवा’ म्हणून, तर पाम तेलापासून बनवलेले ‘चीज अ‍ॅनालॉग’ हे ‘पनीर’ म्हणून विकले जात असल्याचे समोर आले आहे. हे पदार्थ प्रामुख्याने गुजरात राज्यातून १० किलोच्या बॅगांमध्ये ‘स्पेशल बर्फी’ किंवा प्लास्टिक डब्यांमध्ये ‘हलवा’ या नावाने येतात. नियमानुसार, असे पदार्थ विकताना ते पाम तेल व मिल्क सॉलिडपासून बनवलेले आहेत, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक विक्रेते छुप्या पद्धतीने याची विक्री करत असून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई विक्रेत्यांनी आपल्या मेनू कार्ड किंवा फलकावर अशा पदार्थांची स्पष्ट माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल, घटक आणि प्रकार नीट तपासावेत. कोणत्याही संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे किंवा १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी—-मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा आणि समन्वयाने 100%उद्दिष्ट पूर्ती करा– जिल्हाधिकारी किशन जावळेपीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा-

vishwatmaklokswamivarta

नविण्यामार्ग – संमिशन महाराष्ट्र : हतबल पत्रकारितेला स्वावलंबी बचा राजदीप काळे-व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग..

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार-2025कोकण व मुंबई प्राधिकरण विभागांनी पटकाविले सर्वाधिक 33 पुरस्कार

vishwatmaklokswamivarta