vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला.

 कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला आहे. मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करुन निर्बंधांवरुन असलेल्या नाराजीवर सुवर्णमध्य काढला आहे. त्यामुळे ‘लालबागच्या राजा’च्या प्राणप्रतिष्ठेस आता १५ मिनिटांत सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिली

मुंबईसह संपूर्ण राज्यात आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. यंदाही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पण कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे लालबाग परिसरात मोठा फटका स्थानिकांना बसत असल्याचं दिसून आलं. ‘लालबागचा राजा’च्या श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकानं बंद ठेवली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याशिवाय परिसरातील अनेक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असल्यानं स्थानिकांना आपल्या घरी जाण्यासही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं वाद निर्माण झाला होता. स्थानिकांच्या मागण्यांवर लालबागचा राजा मंडळ देखील ठाम होतं आणि राजाच्या प्राणप्रतिष्ठेस विलंब होत होता.

विश्वास नांगरे पाटलांनी काढला सुवर्णमध्य!लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेस निर्बंधांमुळे विलंब होत असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे थेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. मंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर नांगरे पाटील यांनी स्थानिक दुकानदारांसाठी तात्काळ एक नियम जाहीर केला.

“लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी देशाविदेशातून भक्त इथं येत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरात कलम १४४ लागू केलं आहे. त्यात इथली जवळपास १०० दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. कारण दुकानं सुरू ठेवली की गिऱ्हाईक इथं जमणार आणि ते दर्शनासाठी गर्दी करणार. त्यामुळे दुकानं बंद ठेवली होती. पण मंडळाचे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून आता येथील १०० दुकानांच्या मालकांना प्रत्येकी दोन पास देण्यात येणार आहेत. यात दुकानाचा मालक आणि एक कर्मचारी अशा फक्त दोघांनाच दुकानात उपस्थित राहता येणार आहे. नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं तर पुन्हा पूर्वीप्रमाणेच दुकानं बंद केली जातील”, असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार..जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश 

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये 6 महिने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा – पालकमंत्री शंभुराज देसाई

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

पिंपरीत राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कोरोना नियमांना तुडवले.

vishwatmaklokswamivarta