vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

        *बुलढाणा प्रतिनिधी* केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा उज्वला समितीही स्थापन करण्यात आले असून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना विस्तारीत-2 व 3 मध्ये आतापर्यंत 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत विस्तारीत योजना 1 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील, 1 लाख 89 हजार 347 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार देशात विस्तारीत-2 मध्ये 75 लाख तर विस्तारीत-3 मध्ये 25 लाख असे एकूण 1 कोटी अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विस्तारीत-2 मध्ये 8 हजार 694 लाभार्थी तर विस्तारीत-3 मध्ये 7 हजार 483 लाभार्थी असे एकूण 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे, महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य सुधारणा, धूरमुक्त स्वयंपाकघर निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ही योजना केवळ गॅस कनेक्शनपुरती मर्यादित नसून महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे.

000000

संबंधित पोस्ट

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबईकरांना  सतर्क राहण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन – शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल – मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.