vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या समस्या निकाली काढण्याबाबत शासन सकारात्मक व तत्पर आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांचा आणि उद्योग संघटनांचा परस्पर समन्वय असणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी या समस्यांवर समन्वय राखून तात्काळ उपाययोजना कराव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,मनपा उपायुक्त लखीचंद चव्हाण, राष्ट्रीय महामार्गचे अधीक्षक अभियंता आशिष देवकर, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी दुष्यंत आठवले, राजेंद्र चौधरी, राजेश मंथारी आदी उपस्थित होते.

उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, वीज पुरवठ्याची उपकेंद्र, सुरक्षा व्यवस्था याबाबत आपले प्रश्न मांडले. उद्योगांना समाजकंटकांकडून होणारा त्रास याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट निर्देश देऊन सीसीटीव्ही यंत्रणा व पोलीस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले. तसेच अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर गतिरोधक हे निकषांप्रमाणे बसावावे असेही त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी..

vishwatmaklokswamivarta

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

vishwatmaklokswamivarta

जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज . त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta