vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

राज्य प्रतिनिधी-आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

 प्राप्त माहितीनुसार विधानसभा निवडणूक: आसाममध्ये 17.87%, केरळमध्ये 16.23% आणि पुदुच्चेरीमध्ये 17.41% मतदान

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथे आज विधानसभा निवडणुका होत आहेत. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील.

 आसाम आणि केरळ तसेच केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानाला आज गुरुवार सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. निवडणूक आयोगानं मुक्त, निष्पक्ष आणि सुरळीत मतदानासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था केल्याचा दावा केला. सकाळी 9 वाजेपर्यंत आसाममध्ये 17.87%, केरळमध्ये 16.23% आणि पुदुच्चेरीमध्ये 17.41% मतदान होणार आहे.विधानसभेच्या एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात आसाममधील 126 जागांसाठी मतदान होत आहेत. तर केरळमधील 140 जागांसाठी आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी, तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीमधील मतांची मोजणी 4 मे रोजी होणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा- बंदरे मंत्री नितेश राणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-बचतगटांच्या उत्पादनांना मागणी

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे