vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

            अमरावती, प्रतिनिधी : किसान सन्मान निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना येत्या कालावधीत मिळणार आहे. हा लाभ शेतकऱ्यांना तातडीने मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आपला गाव नमुना, सातबारा उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा.

 जिल्ह्यात अचलपूर 7 हजार 721, अमरावती 14 हजार 479, अंजनगाव सुर्जी 5 हजार 411, भातकुली 7 हजार 208, चांदूर रेल्वे 4 हजार 164, चांदूरबाजार 8 हजार 334, चिखलदरा 1 हजार 559, दर्यापूर 9 हजार 408, धामणगाव रेल्वे 5 हजार 821, मोर्शी 9 हजार 176, नांदगाव खंडेश्वर 8 हजार 893, तिवसा 6 हजार 472, वरूड 8 हजार 749 खातेदार ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यापासून शिल्लक आहेत. मात्र धारणी तालुक्यात अधिकचे 731 खातेदार नोंदणी झाली आहे.

     जिल्ह्यात एकूण 5 लाख 16 हजार 195 खातेदार असून आतापर्यंत 4 लाख 22 हजार 649 खातेदारांची नोंदणी झाली आहे. अद्यापही 93 हजार 546 खातेदारांची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. 

शून्यातून विश्व निर्माण करणारी ‘केक क्वीन’: सातारच्या स्मिता बेंद्रे*

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी