vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कच्छ अस्मिता मंचाचा ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’सन्मान सोहळा १५ जुलै रोजी ठाण्यात.

कच्छ अस्मिता मंचाचा ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’सन्मान सोहळा १५ जुलै रोजी ठाण्यात.

ठाणे – प्रतिनिधी- कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ हा सन्मान सोहळा बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत सुरेश गडा यांनी दिली.

हेमराज शहा यांनी १९८० पासून महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छ समाजातील व्यक्तींना ‘कच्छशक्ती पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू केली. त्या प्रेरणेने कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरश गडा यांनी सन २००६ मध्ये कच्छ अस्मिता मंचाची स्थापना करून कच्छ वागड समाजातील विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या ठाण्यातील व्यक्तींचा ‘कच्छ पागडी’ देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला.

गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ या उपक्रमाद्वारे शिक्षण, विज्ञान, उद्योग-व्यवसाय, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ गुणवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच समाजहिताची प्रेरणाही मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. या उपक्रमाला कच्छ समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दरवर्षी ‘यंदाची कच्छ पागडी कोणाला?’ याबाबत समाजात विशेष उत्सुकता निर्माण होते.

यंदाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच ठाण्याचे खासदार, आमदार, महापौर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवडक मान्यवरांचा ‘कच्छ पागडी’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

पालक सचिव यांनी घेतला विकास कामाचा आढावा· पालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

धार्मिक सण, जयंती उत्सव परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta