vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

मुंबई, प्रतिनिधी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक व अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम शुक्रवार, १७ जुलै रोजी पु. ल कट्ट्यावर आयोजित करण्यात आला आहे. नवीन लघु नाट्यगृह, रवींद्र नाट्य मंदिरच्या मागच्या बाजूला, पाचवा मजला येथे सायंकाळी सहा वाजता ही स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैय्याज तसेच पं. राजा काळे, पंडित चंद्रकांत लिमये यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर पंडितजींच्या आठवणी जागवतील. पं. मुकुंद मराठे, मकरंद कुंडले, अतुल ताडे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पं. चंद्रकांत लिमये यांच्या गुरुकुलातील काही शिष्यांचेही गायन या कार्यक्रमात होणार आहे. तसेच पंडितजींचे काही दुर्मिळ ऑडिओ व व्हिडिओ देखील रसिकांना ऐकायला व पहायला मिळतील.

 

हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे . शास्त्रीय व नाट्य संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या कलावंताला आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व वसंतराव देशपांडे संगीत सभा, मुंबई या दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

महासाधना सप्ताह;सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘कर्मयोगी’प्रशिक्षण पूर्ण करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

रस्ते मोकळे, श्वास मोकळा! — ठाणेकरांनी आता पुढे काय करावे?— विजयकुमार कट्टी

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार राज्याच्या सागरी उद्योग क्षेत्राची नवी भरारी

vishwatmaklokswamivarta

भारतीय कृषक समाज महाराष्ट्र संस्थेचा जळगावात शेतकरी मेळावा.उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकऱ्याचा सम्मान.

vishwatmaklokswamivarta