vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

 विदेश प्रतिनिधी

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी केला आहे. कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा, असं दुतावासानं म्हटलं आहे.

जे भारतीय सध्या इराणमध्ये राहत आहेत, त्यांनी उपलब्ध विमान पर्यायांनी तात्पुरतं इराण सोडण्याचा विचार करावा. इराणमध्येच राहू इच्छिणाऱ्या भारतीयांनी अत्युच्च खबरदारी पाळावी, त्यांनी सद्यस्थितीबाबत जागरुक राहण्यासाठी बातम्यांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून राहावं आणि दक्षिण किनारपट्टीसारख्या अधिक लष्करी गतिविधींची शक्यता असलेली ठिकाणं टाळावीत, स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं दूतावासानं सांगितलं आहे.

ज्या भारतीय नागरिकांनी आपले तपशील दुतावासाकडे अद्याप नोंदवलेले नसतील, त्यांनी ते तातडीनं नोंदवावेत आणि भारतीय दुतावासाच्या संकेतस्थळाला आणि समाजमाध्यमांना नियमितपणे भेट द्यावी असं दुतावासानं म्हटलं आहे.

दुतावासानं आपत्कालीन हेल्पलाईनचे क्रमांकही प्रसिध्द केले आहेत 

संबंधित पोस्ट

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार**महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात एका वर्षांत १५.७२ लाख कोटींची गुंतवणूक,१ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एलियास चर्चमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण गंभीर जखमी…

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई