
तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..
विदेश प्रतिनिधी
तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी केला आहे. कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा, असं दुतावासानं म्हटलं आहे.
जे भारतीय सध्या इराणमध्ये राहत आहेत, त्यांनी उपलब्ध विमान पर्यायांनी तात्पुरतं इराण सोडण्याचा विचार करावा. इराणमध्येच राहू इच्छिणाऱ्या भारतीयांनी अत्युच्च खबरदारी पाळावी, त्यांनी सद्यस्थितीबाबत जागरुक राहण्यासाठी बातम्यांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून राहावं आणि दक्षिण किनारपट्टीसारख्या अधिक लष्करी गतिविधींची शक्यता असलेली ठिकाणं टाळावीत, स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं दूतावासानं सांगितलं आहे.
ज्या भारतीय नागरिकांनी आपले तपशील दुतावासाकडे अद्याप नोंदवलेले नसतील, त्यांनी ते तातडीनं नोंदवावेत आणि भारतीय दुतावासाच्या संकेतस्थळाला आणि समाजमाध्यमांना नियमितपणे भेट द्यावी असं दुतावासानं म्हटलं आहे.
दुतावासानं आपत्कालीन हेल्पलाईनचे क्रमांकही प्रसिध्द केले आहेत



