
कानपूरमध्ये भीषण अपघातात; 27 जण जागीच ठार, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त..
कानपूर प्रतिनिधी
भीषण अपघात: भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली; 27 जणांचा मृत्यू
कानपूर – प्रतिनिधी उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. या अपघातात 40 भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली. ट्रॉलीतील सर्व भाविक तलावाच्या पाण्यात बुडाले. अपघातानंतर भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 14 मुले आणि 13 महिला असल्याची माहिती आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेले लोक उन्नाव जिल्ह्यात असलेल्या माँ चंद्रिका देवीचे दर्शन घेऊन परतत होते. घटनास्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा (Kanpur Road Accident) अपघातात झालाय. या अपघातात 27 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत आहे. ट्रॅक्टर-टॅलीचे नियंत्रण न झाल्याने हाडासा झाला. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे 50 जण होते, असे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 14 मुले आणि 13 महिला असल्याची माहिती आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेले लोक उन्नाव जिल्ह्यात असलेल्या माँ चंद्रिका देवीचे दर्शन घेऊन परतत होते. घटनास्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतरांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील, अशी माहिती पीएमओने दिली आहे.



