vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक

मुंबईत 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. सीट बेल्ट न लावल्यास कारवाई केली जाणार आहे. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांच्या चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट (Seat Belt) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. सीट बेल्ट न लावल्यास कारवाई केली जाणार आहे. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, 1 नोव्हेंबरपासून महानगरात चारचाकी चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक असेल. एका निवेदनात शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने सर्व वाहनचालक आणि वाहनधारकांना 1 नोव्हेंबरपूर्वी चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट बांधण्याचे निर्देश दिले आहेत आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

दरम्यान, 1 नोव्हेंबरनंतर मुंबईच्या रस्त्यावर चारचाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्या सर्व मोटार वाहन चालकांना आणि प्रवाशांना सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मोटार वाहन (सुधारणा) कायद्याच्या कलम 194 (ब) (1) अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. कायद्यातील तरतुदीनुसार, जो कोणी सुरक्षा बेल्ट न लावता मोटार वाहन चालवेल किंवा सीट बेल्ट न लावता प्रवाशांना घेऊन जाईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

तथापी, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा गेल्या महिन्यात पालघर जिल्ह्याजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.

संबंधित पोस्ट

अफगाणिस्तान मध्ये तालिबानीआतंकवाद्यांनी केली पत्रकाराची हत्या, पत्रकाराच्या हत्येच्या निषेधार्थ.  मुंबई प्रेस क्लब तर्फे कॅन्डल मार्च..

vishwatmaklokswamivarta

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक

हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते 

vishwatmaklokswamivarta

आदर्शवत समन्वयातून कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी पूरनियंत्रण

राज्या सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील तण जाळणाऱ्यांवर  कायदेशीर कारवाईपासून सूट.