vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, ठाणे पोलिसांना पत्र लिहत केली विशेष मागणी

राष्ट्रवादी पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, ठाणे पोलिसांना पत्र लिहत केली विशेष मागणी…

ठाणे प्रतिनिधी

जितेंद्र आव्हाडां विरोधात विनयभंगाचं कलम लावण्यातं यावं अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळेनी केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे  आणि वाद ह्याचं नातं काही नवं नाही. पण ज्या प्रकरणात केतकीचा काहीही संबंध नाही अशा वादात आता केतकीने पुन्हा एकदा उडी घेतली आहे. राज्यभरात पुन्हा एकदा हर हर महादेव सिनेमाच्या वादातून वातावरण तापलं आहे. राष्ट्रावादीचे महत्वाचे नेते जितेंद्र आव्हाड  यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हर हर महादेव सिनेमाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाडांनी शो बंद करत सिनेमा हॉलवर  थेट हल्ला चढवला. तरी दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मराठी रसिकांना मारहाण करण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. याचं प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना  ताब्यात घेण्यात आले आहे. तरी या प्रकरणात आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने  उडी घेतली आहे.

 

जितेंद्र आव्हाड  यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील असं केतकी चितळेचं मत आहे. तरी  या कलमांध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात यावं कारण चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या  कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावण्यातं यावं अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळेनी केली

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या नेतेसह कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. पण केतकी चितळेने घेतलेल्या या उडीनंतर वातावरण आणखीचं चिघळण्याची शक्यता आहे. हर हर महादेव सिनेमातील अभिनेते सुबोध भावे यांनी आतापर्यत यावर कुठलीही प्रतिक्रया दिलेली नाही. तरी केतकीच्या या मागणीनंतर ठाणे पोलिस काय प्रतिक्रीया देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त..

गडचिरोलीत रंगणार ‘कोया कृषी कुंभ’* *जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजनाचा आढावा*

आमदार नगर विकास मंत्री नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आमदारांचे संख्याबळ 50च्या पुढे जाण्याची शक्यता – सुत्र

मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील बालेवाडी  हायस्ट्रीट पाठशाळा परिसरातून अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण  उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचा अद्याप शोध लागलेला नाही, मिळेल ती माहिती देण्यासाठी आमदार यांचे जनतेला आवाहन

vishwatmaklokswamivarta