
मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे…
[ मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या )कामाची…दिवसेंदिवस महागाईचा वाढता दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं असताना आता मुंबईकराच्या महिन्याच्या बजेटला फटका बसणार आहे. कारण मुंबई महापालिकेने (bmc)घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांचं पाणी महागलं आहे. हो, मुंबईकरांना आता पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल पाणीपट्टी दरवाढीला (price hike) मंजुरी दिला आहे.
पाणी पट्टीत वाढ का?
गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईकरांवरील पाणी दरवाढीचं संकट टळलं होतं. कोरोना महामारीमुळे मुंबई महापालिकेने पाणी दरवाढीचा निर्णय घेतला नव्हता. अखेर आता मुंबईकरांच्या खिशाला चोट बसणार आहे. कारण मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता हजार लीटरमागे मुंबईकरांना 35 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत
कोणाला किती पैसे मोजावे लागणार? (प्रतिहजार लिटर)
झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे – 4.76 पैसे
झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती – 5.28 पैसे
व्यावसायिक ग्राहकांसाठी – 46.75 पैसे
बिगर व्यापारी संस्था – 25.46 पैसे
उद्योगधंदे, कारखाने – 63.65 पैसे
रेसकोर्स, तीन आणि त्याहून अधिक तारांकित हॉटेल – 95.49 पैसे
बाटलीबंद पाणी कंपन्या – 132.64 पैसे



