vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

 

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद ठाणे) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शाळांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. असून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शीघ्रतेने ही योजना पुर्ण करण्यात येत आहे

जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ मधील उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत कल्याण तालुक्यात १२० सीसीटीव्ही, भिवंडी ३०८ सीसीटीव्ही बसविण्याचे काम १०० टक्के पुर्ण असून अंबरनाथ तालुक्यात ९६ सीसीटीव्ही बसवण्यात आले तर १८ शाळेतील कामकाज प्रगतीपथावर आहे. असे एकूण ५२४ शाळांमध्ये शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयामार्फत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२५-२६ मधील जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीतून सीसीटीव्ही बसविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुरबाड गटातील ३२९ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून या शाळांमधील सर्व यंत्रणा मार्च २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत. शहापूर गटातील ४५७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून या शाळांमधील सर्व यंत्रणा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या दृष्टीने ही सीसीटीव्ही योजना राबविण्यात येत आहे.

“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम शीघ्रतेने करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून उर्वरित शाळांमध्येही शीघ्रतेने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. यामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध राहण्यास मदत होणार आहे.” – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे

000

संबंधित पोस्ट

राज्यातील विकासप्रकल्पांचा ‘पीएमयू’च्या बैठकीत आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार…

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन…

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

सर्व ग्रामपंचायतीमध्ये ३ नल-जल मित्रांची होणार नियुक्तीइच्छुकांनी तात्काळ ग्रामपंचायतशी संपर्क साधावा -मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न*

vishwatmaklokswamivarta