vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी  -जिल्हाधिकारी किशन जावळे

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी  -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड( प्रतिनिधी आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित आदिवासी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्स श्री.पाटील, प्रकल्प संचालक, आदिवासी विभाग पेण आत्माराम धाबे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, रायगड विजय कुलकर्णी आदीसह इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके आढावा घेणार आहेत. याकरिता प्रत्येक विभागाने आपली कामे पूर्ण करावीत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM JANMAN)] धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, वनहक्क दावे व इतर योजना याबाबत काही प्रलंबित कामे असतील तर ती कामे पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी उपस्थित सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

०००००००

संबंधित पोस्ट

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

मानखुर्द परिसरात ५ एकर शासकीय जागा अतिक्रमणमुक्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून निष्कासनाची कारवाई

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी – आमदार विलास तरे# कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देऊन जोरदार मागणी

vishwatmaklokswamivarta

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई 

vishwatmaklokswamivarta

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस