vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक विभागाच्या विद्यानिकेतन धर्तीवर चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश देण्यासाठी १२ एप्रिल २०२६ रोजी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी केले आहे

नाशिक विभागांतर्गत शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा (कॅम्प मवेशी), ता. अकोले व शासकीय आदर्श आश्रमशाळा देवमोगरा, ता. नवापूर, जि. नंदुरबार या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. या शाळांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार पुढील शैक्षणिक वर्षात ५ वीत प्रवेश दिला जातो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश मिळविण्यासाठी चालू शैक्षणिक वर्ष (२०२५-२६) मध्ये चौथीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे कन्या विद्यालय, अकोले, ता. अकोले हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमाती व आदिम जमातीचे विद्यार्थी पात्र राहतील. प्रवेशार्थी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (रहिवासी) असणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाखापेक्षा अधिक नसावे. सदर परीक्षेसाठीचे अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) तसेच या कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले अर्ज आणि त्यासोबत पालकांचे मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी (अधिवास) प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड, तसेच विद्यार्थ्याच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोसह सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे

000

 

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी; पावसात २ जणांचा मृत्यू ♦️उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये १८ जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला प्रभावित भागात मदत आणि बचावकार्य सुरु.

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

पंढरपूर कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta