vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

 

जालना (प्रतिनिधी) : मालकी हक्काच्या लढ्यासाठी सौ. जयश्री संजय कटके यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आता बाराव्या दिवशी पोहोचले असून त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट सवाल उपस्थित केला आहे. कटके यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, सुनील मोहनलाल राठी, अनिल मोहनलाल राठी, मयूर राठी, अनिल मालपाणी व सुरेश मालपाणी यांनी गुंडांच्या मदतीने त्यांच्या जागेवरील सामानाची तोडफोड केली, बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे तर जीव घेण्याचाही प्रयत्न झाल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून स्वतःच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, १२ दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का? सामान्य नागरिकांना न्याय मिळणार की नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उपोषणाचा तेरावा दिवस सुरू होत असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा..

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहिम

आप खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दोन तृतीयांश खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात विलीन …