vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

 ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

कोल्हापूर प्रतिनिधी- कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापुरातील शिवाजी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या पुस्तकाद्वारे महाराजांचा जाज्वल्य इतिहास लोकांसमोर विकृत करून मांडला आहे. चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यावर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकात ‘भवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार दिलीच नाही’, तसेच “हिंदु धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले, हे खरे नाही” असे दावे करण्यात आले असून, ते ऐतिहासिक पुराव्यांच्या पूर्णतः विपरीत आहे. तसेच ‘हिंदवी स्वराज्य’ ही महाराजांची स्वतःची इच्छा होती, हा त्यांचा मूलभूत विचारही पुस्तकात नाकारण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे ‘वैचारिक खच्चीकरण’ करण्याचा एक सुनियोजित कट आहे. राजमाता जिजाबाई यांनी महाराजांना रामायण-महाभारत आदी धर्मग्रंथांतील कथा सांगून त्यांना मोघलांच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध केले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या बुडवल्या. मोगलांना यमसदनी धाडले. अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. ते हिंदूंचे राजे झाले. असे असतांना या पुस्तकाद्वारे त्यांची पूर्णत: चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भाजपचे श्री. महेश जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, आरोग्य भारतीच्या वैद्या अश्विनी माळकर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुहास चव्हाण, श्री. शशी बीडकर, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांनी सरकारकडे या पुस्तकाच्या विक्रीवर आणि वितरणावर तात्काळ बंदी घालण्याची आग्रही मागणी केली आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख न हटवणाऱ्या प्रकाशक आणि संबंधित संस्थांवर भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि १९६ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती नेमून या पुस्तकातील प्रत्येक विधानाचा अभ्यास करावा आणि केवळ छापील पुस्तकेच नव्हे, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध असलेल्या डिजिटल प्रती आणि पीडीएफ लिंक्स सायबर कायद्यांतर्गत तात्काळ ब्लॉक कराव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.श्री. सुनील घनवट,राष्ट्रीय समन्वयक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती,संपर्क क्र. : ७०२०३८३२६४)

—–

संबंधित पोस्ट

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा – सभापती प्रा. राम शिंदे सक्षम ग्रामपंचायतींवरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारीजिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये ‘नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ उपकंपनी स्थापन करणार

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन