vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली-छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो

मुंबई, प्रतिनिधी : छायाचित्रातून मानवी भावभावनाना टिपणारे आतरराष्ट्रीय छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांच्या निधनामुळे भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला मुकलो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, रघु राय यांनी कॅमेरातून भारताच्या विकासाची गाथा छायाचित्रबद्ध केली आहे. त्यांनी भारताचा इतिहास, भारतीय जनमानसाच्या भावना आणि भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यांना कॅमेरातून पकडले. भोपाळ वायू दुर्घटना पीडितांच्या वेदनांना त्यांनी छायाचित्राच्या माध्यमातून जगासमोर मांडले. त्यामुळेच भोपाळ वायू दुर्घटनेकडे जगाचे लक्ष वेधले गेले.

राय यांच्या अनेक कलाकृतींना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्यांनी छायाचित्राविषयी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी टाईम, लाईफ, द न्युयार्क टाईम्स आदी प्रकाशनासाठीही काम केले. त्यांना 1972 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना अनेक राष्ट्रीय आतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

त्यांनी वर्ल्ड प्रेस फोटो साठी ज्युरी म्हणून काम केले. युनेस्कोच्या आतरराष्ट्रीय फोटो स्पर्धेसाठीही काम केले. या माध्यमातून त्यांनी नवीन छायाचित्रकार घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या ह्युमन मैनैजमेट आफ वाईल्डलाईफ इन इडिया या छायाचित्र प्रंबधाला अमेरिकेत फोटोग्राफर आफ द ईयर पुरस्कार मिळाला होता. फ्रेंच सरकारनेही त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले होते. सत्य, आर्तता आणि कारुण्य या शब्दात व्यक्त करण्यास अवघड असणाऱ्या क्षणांना त्यांनी आपल्या छायाचित्रातून टिपले. त्यांनी भारताच्या विकासाचे टिपलेले अनेक क्षण आधुनिक भारताचे चित्रमय दस्तावेज आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छायापत्रकार रघू राय यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

विधी व न्याय विभाग-तात्पुरत्या स्वरुपातील 16 अतिरिक्त न्यायालये,२३ जलदगती न्यायालयांना २ वर्षांची मुदतवाढ…

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा 

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta