vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-केंद्र शासनातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना गौरवण्यासाठी केंद्र सरकारने पात्र बालकांकडून किंवा त्यांच्या वतीने संस्थांकडून नामनिर्देशन (Nominations) मागविले आहेत. यासाठी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो.यात शौर्य,क्रीडा,समाजसेवा,विज्ञान आणि तंत्रज्ञान,पर्यावरण,कला आणि संस्कृती,नवोन्मेष (Innovation)याचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी बालकाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्ज केवळ*https://awards.gov.in* या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.स्वतः बालक, पालक, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हाधिकारी, पंचायती राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था किंवा शैक्षणिक संस्था संबंधित बालकाचे नाव पुरस्कारासाठी सुचवू शकतात.ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२६ ही आहे.जिल्ह्यातील ज्या बालकांनी शिक्षण, कला, क्रीडा किंवा सामाजिक कार्यात विशेष नैपुण्य मिळवले आहे, त्यांच्या पालकांना आणि संबंधित संस्थांना विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी संबंधितांनी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, कोमल कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे उच्च प्रतिनिधी / युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष काजा कलास यांच्यासोबत भेट

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री यांचा अतिवृष्टीग्रस्त भागांना दौरा; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश    – ना.मकरंद पाटील

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…