vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-केंद्र शासनातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना गौरवण्यासाठी केंद्र सरकारने पात्र बालकांकडून किंवा त्यांच्या वतीने संस्थांकडून नामनिर्देशन (Nominations) मागविले आहेत. यासाठी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो.यात शौर्य,क्रीडा,समाजसेवा,विज्ञान आणि तंत्रज्ञान,पर्यावरण,कला आणि संस्कृती,नवोन्मेष (Innovation)याचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी बालकाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्ज केवळ*https://awards.gov.in* या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.स्वतः बालक, पालक, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हाधिकारी, पंचायती राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था किंवा शैक्षणिक संस्था संबंधित बालकाचे नाव पुरस्कारासाठी सुचवू शकतात.ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२६ ही आहे.जिल्ह्यातील ज्या बालकांनी शिक्षण, कला, क्रीडा किंवा सामाजिक कार्यात विशेष नैपुण्य मिळवले आहे, त्यांच्या पालकांना आणि संबंधित संस्थांना विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी संबंधितांनी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, कोमल कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी,अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीअंतर्गत नोंदणी तसेच भाग-१ मधील आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta