vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

लातूर, प्रतिनिधी: जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडून दूरध्वनीद्वारे जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेतली.

रेणापूर, अहमदपूरसह इतरही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

प्राथमिक अहवालानुसार सोमवारी रेणापूर तालुक्यात काही ठिकाणी, तसेच निलंगा तालुक्यातील लिंबाळा परिसरात वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीट झाली. तसेच औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात, जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे काही गावांमध्ये पत्र्याची घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच गहू, हरभरा व ज्वारी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच उदगीर तालुक्यातील वायगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिगंबर राम बेलकुंडे (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला. इतर तालुक्यातील नुकसानीचीही माहिती घेण्यात येत असून सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

*****

संबंधित पोस्ट

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे आज वितरण

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश,महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- उद्योजकता विकास प्रशिक्षणात 900 महिला सहभागी – जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाखांची तरतूद

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर