
छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचारावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; नेत्यांनाही शांतता राखण्याचं आवाहन
मंत्रालय प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचार हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
जळगाव मध्ये दोन गटात तुफान राडेबाजी झाल्यानंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीचे काही प्रसंग घडले आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचार हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे. सोबतच लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. फडणवीसांनी राजकीय मंडळींनाही आपल्या स्वार्थासाठी भडकाऊ विधानं न करण्याचे सूचित केले आहे. सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे तर हिंदू बांधव आज श्रीराम नवमी साजरी करत आहेत
It is an unfortunate incident, efforts are on to bring peace, some people are trying to worsen the situation. Leaders should be careful how they behave in such times. Some leaders are making statements for selfish reasons, they shouldn’t do it: Maharashtra Dy CM Devendra Fadnavis…



