
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी घेतला जगाचा निरोप…
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महालक्ष्मी येथील ब्रिजकँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. रतन टाटा आहे अनेक दिवसापासून ते आजारी होते टाटा सन्स या देशातील सर्वात मोठे व्यावसायिक ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना, रक्तदाब अचानक कमी झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 86 वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि 2012 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी 1996 मध्ये टाटा सर्व्हिसेस आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांची स्थापना केली. त्यांना भारताचे दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) प्रदान करण्यात आले आहेत. टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती. त्यांनी देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी अशी अनेक कामे केली, ज्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील



