
तामिळनाडूमध्ये पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. सेल्लूर आणि मदुराई जिल्ह्यांतील सखल भागात पूर -प्रशासनाला मदत कार्याच्या सूचना..
राज्य प्रतिनिधी
तामिळनाडू राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेले आहे घराघरात पाणी शिरलेले आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यावरही पाणी जमा झालेले आहे यातून मार्ग काढण्यासाठी आणि लोकांना मदतीसाठी तामिळनाडू सरकारच्या वतीने प्रशासनाला मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत..
तामिळनाडूमध्ये पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. सेल्लूर आणि मदुराई जिल्ह्यांतील सखल भागात पूर आला आहे. त्यामुळे शहरासह परिसर जलमय झाला आहे. शहरातील रस्त्यांपासून ते शाळांपर्यंत लोकांच्या घरापर्यंत पाणी तुंबले आहे. मदुराई जिल्ह्यात 9.8 सेंटीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 15 मिनिटांत 4.5 सेमी पावसाची नोंद झाली. मदुराईचे आयुक्त दिनेश कुमार सांगतात की, ऑक्टोबरमध्ये गेल्या 25 दिवसांपासून पाऊस पडत आहे. सरासरी पाऊस 200 मिमी आहे, तर कालचा पाऊस 260 मिमी होता. बाधित भागात बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी मंत्र्यांनाही तैनात करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



