जालना : प्रतिनिधी जालना येथील श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनातर्फे दर गुरुवार आणि शनिवारी अन्नदान करण्यात येत आहे. याही शनिवार व गुरुवारी गोर-गरीबांना संस्थेच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यापुढेही अन्नदान करण्याची इच्छा असेल अशांनी (९९६०२६१३५१/८६००६२१५१७)अमोल टाकळकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुहास वैद्य, अमोल टाकळकर,रवी शिरसाठ, अभिजीत कुलकर्णी, भूषण कुलकर्णी, गणेश मावळे, सुनील काळे,दिनेश घुले, रंजीत घाडगे, श्रीपाद सातोनकर आदींनी परिश्रम घेतले.