
गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्य प्रतिनिधी-नागपूर, : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.



