मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..
मुंबई प्रतिनिधी- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसापासून आझाद मैदानामध्ये लाखो समर्थकांसह मैदानात उपोषणाला बसलेले आहेत सरकारने याची गंभीर दखल घेऊन लवकरच आरक्षणाचा मुद्द्याचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न चालू असल्याचे कळते याकरता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या उप समिती आज रात्रीपर्यंत सदर मुद्या संदर्भात प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, मंत्रिमंडळ उपसमिती आज प्रस्ताव तयार करणारमनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली ,मंत्रिमंडळ उपसमिती आज रात्रीतून प्रस्ताव तयार केला जाणार प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.अश्यात अजून ही आंदोलकांची प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्याने सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आज काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.