vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

 जालना प्रतिनिधी :आनंद विवाह नोंदणी अधिनियम संपुर्ण जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी 1999 नुसार राज्यात झालेल्या विवाहांची नोंदणी करुन पक्षकारांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. विवाह नोंदणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या दि.23 एप्रिल 2020 च्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्र शासन आनंद विवाह नोंदणी निंबधक म्हणुन महानगरपालिका – संबंधीत प्रभाग अधिकारी,नगरपालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे – संबंधीत मुख्याधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा स्तर) तसेच विवाह निबंधक (महानगर पालिके मधील संबंधीत प्रभाग अधिकारी तसेच मुख्याधिकारी नगर पालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे यांना कळविण्यात येते की, आनंद विवाह नोंदणी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शीख समाजाचे विवाह हे आनंद विवाह नोंदणी अंतर्गत नोंदविण्यासाठी या समाजाला अडचणी येणार नाहीत. शीख समाजाला विवाह नोंदणी केल्यामुळे शासकिय कायदेशिर फायदे मिळणे सुलभ होईल.

सर्व शीख समाजातील नागरिकांनी आनंद विवाह नोंदणी मध्ये विवाह नोंद करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी उपाय योजावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी-नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी.

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडले जाणार♦️आठ तास चर्चा होण्याची शक्यता चर्चेसाठी आवश्यक वाटल्यास वेळ वाढवण्यात येईल.- संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार