vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे सर्व जाती धर्मीयांना न्याय देणारे संविधान आहे.भारताचे संविधान कधी ही बदलले जाणार नाही.मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य विरोधकांनी संविधान बदलले जाईल अशा खोट्या अफवा पसरवल्या.संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरवणारेच संविधान विरोधी आहे.संविधान बदलण्याचे फेक नरेटिव्ह पसरवणारे लोकच समाजात फुट पाडत आहेत.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

                          मुंब्रा येथे धम्म चक्र प्रवर्तन कट्टाचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकापर्ण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतुन मुंब्रा पोलिस स्टेशन जवळ धम्मचक्र प्रवर्तन कट्टा उभारण्यात आलेला आहे. या कट्ट्यात ग्रंथालय वाचनालय आणि बैठकांसाठी हा कट्टा बहुउपयोगी ठरेल असे ना.रामदास आठवले म्हणाले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे,बापु मखरे,भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले,नितीन मोरे,योगेश भुजबळ आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान मजबुत करणारे नेते आहेत.मोदींच्या मंत्री मंडळाचा मी एक भाग आहे.त्यामुळे संविधानला कोणीही हात लावणार नाही त्या बद्दक निश्चित रहा.केंद्रात मी मंत्री झाल्यापासुन देशभरात रिपब्लिकन पक्ष वाढत आहे.सर्व जाती धर्मीयांनी रिपब्लिकन पक्षाला सहकार्य करावे.समाजात वाढत असणारे महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.

 

हेमंत रणपिसे

प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ: शिंदेंकडून खोपोली येथील बस अपघात दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर..

मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील गिरगाव येथील एलआयसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य हायलँड पार्क मैदानावर दि.22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण.

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta