
शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय…साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल…
राज्य प्रतिनिधी-
शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडामध्ये मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. त्यानुसार आधी कर्मचाऱ्यांची कामाची वेळ पहाटे 4 वाजता सुरू व्हायची. आता ती सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर साई संस्थानाने हे मोठं पाऊल उचललं आहे. तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संस्थानच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.



