vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक, संसदेत निदर्शने

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक, संसदेत निदर्शने

 

नवी दिल्ली प्रतिनिधी: महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणामुळे अडचणीत सापडले आहेत. राज्यातील ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू असली तरी, अनेक शेतकऱ्यांचा अद्यापही सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असून, खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या खासदारांनी सोमवारी संसदभवन परिसरात निदर्शने करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, प्रशांत पडोळे, बळवंत वानखेडे आणि शिवाजी काळगे यांनी सहभाग घेतला.

खासदारांनी सरकारला इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सविस्तर चर्चा..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला🔸वाढत्या तणावावर तीव्र चिंता व्यक्त🔸 स्थैर्य टिकवण्यासाठी तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta