vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश..

पुणे, प्रतिनिधी: सणसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली; पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री श्री. भरणे यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून घेऊन ते म्हणाले, सणसर येथील ओढ्याला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. नागरिकांची ओढा खोलीकरणाची मागणी विचारात घेता, त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने लवकरात लवकरात ओढ्याचे खोलीकरण काम करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री भरणे यांनी दिले.

यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे -मुख्य सचिव राजेश कुमार

vishwatmaklokswamivarta

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू 🗳️

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta