vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहान**रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा* 

*नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहान**रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा*

मुंबई प्रतिनिधी- नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडुन आमच्या सोबत आले पाहिजे.त्यांच्या त्यागाचा आम्ही आदर करतो.न्यायासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार वाटचाल करावी.नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे.जनतेत जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवावी.नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या जनसुरक्षा कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहिर करताना आज मुंबईत ना.रामदास आठवलेंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्विकारण्याचे आवाहन केले.

 

                जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या हिताचा आहे.संविधानाने विधानसभा, विधी मंडळाला कायदा करण्याचा अधिकार दिला आहे.त्यानुसार जनसुरक्षा कायदा विधिमंडळात संमत झालेला आहे.विद्रोही लेखन जरुर करावे.नक्षलवाद्यांच्या हिंसक मार्गाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारे लेखन करु नये.शहरी नक्षलवाद रोखला पाहिजे.हिंसक मार्गामुळे हजारो नक्षलवादी मारले गेले आहेत.मागुन वार करण्याची पध्दत योग्य नाही.समोर येवून वैचारिक वार केला पाहिजे.आम्ही सुध्दा दलित पँथरच्या चळवळीत संघर्ष केला आहे.आमच्या दलित पँथरला कोणीही नक्षलवादी म्हटले नाही.जनसुरक्षा कायद्यामुळे कोणाही निरपराधाला जाणिवपुर्वक नक्षलवादी ठरवू नये.जनसुरक्षा कायद्यामुळे असे चुकीचे प्रकार घडुन अन्याय होवू लागला तर या कायद्यात बदल करण्याचा अधिकार विधीमंडळाला आहे.सरकारने सर्व बाजुंचा विचार करुनच जनसुरक्षा कायदा केला आहे.असे सांगत ना.रामदास आठवले यांनी जनसुरक्षा कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा याचे जाहीर केले

संबंधित पोस्ट

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची..

vishwatmaklokswamivarta

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

CoffeewithCollector उपक्रमांतर्गत #जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहिता योग्यच!पंतप्रधानही वस्त्रसंहितेचे पालन करतात; सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसांहिता लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत