आज गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
राज्य प्रतिनिधी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. गोव्यामध्ये स्वदेशी विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांतवर ही दिवाळी साजरी केली गेली. या वेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील तिन्ही सैन्यदलांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारे वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदींनी सैनिकांच्या कष्टांचे आणि बलिदानाचे महत्त्व सांगितले. या दिवाळीच्या दिवशी, एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला भारतीय सैनिकांची अनंत शक्ती पाहून मला अभिमान वाटतो. आपल्या जवानांच्या कष्टांमुळेच देश सुरक्षित आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये जवानांनी दाखवलेली देशभक्ती आणि उत्साह शब्दात व्यक्त करता येणार नाही. आयएनएस विक्रांत हे केवळ एक युद्धनौका नाही, तर भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण उद्योगाचे प्रतीक आहे. या युद्धनौकेच्या नावाने शत्रूंच्या मनातच भीती निर्माण होते. आयएनएस विक्रांतला फक्त युद्धसामर्थ्याने नव्हे तर भारताच्या परिश्रम, कौशल्य, प्रभाव आणि वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून पाहावे, असे त्यांनी म्हटले.भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये सातत्यपूर्ण प्रगती होत आहे.