vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

जालना, प्रतिनिधी : सन 2024-25 यावर्षीपासून इयत्ता 10 वी व 12 वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील जिल्हा/विभाग/ राज्य/ राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील पात्रता धारक खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईनद्वारे भरावयाचा आहे. जालना जिल्ह्यातील कोणत्याही खेळाडूचा ग्रेस गुणाचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून ऑफलाईन पध्दतीने स्वीकारला जाणार नाही.

आपले सरकार पोर्टवरीती ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यापासून खेळाडू विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान भरपाईस सदर मुख्याध्यापक/प्राचार्य जबाबदार राहतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी.

त्यानुसार जिल्ह्यातील सदर मुख्याध्यापक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांनी दि. 31 मार्च 2025 पर्यंत आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईनवर ग्रेस गुणाचे अर्ज करण्यात यावे असे आवाहन संजय गाढवे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***

संबंधित पोस्ट

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

नवीन पूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेलआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव…

अपंग कल्याण, पुनर्वसन संस्थेत वृक्षारोपण

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या खंडीत कालावधीतील प्रस्ताव१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावेत – अंकुश माने

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय….

vishwatmaklokswamivarta

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…