vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात गुरुवार, दि. 10 एप्रिल रोजी महावीर जयंती तसेच शनिवार दि. 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. निर्बंधाच्या कालावधीत मांसविक्री होणार नाही, याची दक्षता देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

 जैन धर्मियांच्या वतीने महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीनिमित्त उत्सव मिरवणूक काढण्यात येतात. सध्या विविध राजकीय पक्ष संघटनांकडून सुरु असलेली आंदोलने, औरंगजेबाची कबर काढण्याच्या कारणावरुन नागपूर येथे उद्भवलेली जातीय दंगलीची पार्श्वभूमी, राज्यातील राजकीय घडामोडी व त्यांच्याकडून विविध मागण्या संदर्भात होणारे आंदोलने, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी, तसेच उत्सवाचा मागील इतिहास लक्षात घेता या उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दक्षता बाळगणे आणि खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणून चोख बंदोबस्त नेमणे आवश्यक असल्याने उत्सवाचे काळात दि. 10 एप्रिल 2024 रोजी श्री महावीर जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवावीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

आज 19 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी…

विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावेत – पालकमंत्री अतुल सावे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभात विशेष योजना:-

vishwatmaklokswamivarta

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपालांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

शेगावच्या आनंद सागर बाबत मोठी बातमी…कोट्यवधी रुपयांच्या इमारती, रेल्वे ट्रॅक, ढोलपुरी गेट तोडले !देणगीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा,धर्मादाय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta