vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर प्रादेशिक विभागातील वनविभागाच्या कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उप वनसंरक्षक, शहापूर (प्रादेशिक) श्री.दीपेश मल्होत्रा (भा.व.से.) यांच्या शुभहस्ते विभागातील वर्ग तीन व चार मधील उत्कृष्ट आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

या प्रेरणादायी सोहळ्याला वनविभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अभिजीत पिंगळे, कार्यालय अधीक्षक अक्षदा पाटील यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.श्री.मल्होत्रा यांनी आपल्या मनोगतातून सर्व सन्मानित कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांच्या समर्पित वृत्तीमुळेच विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडते. तसेच, इतरांनाही यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रथम क्रमांक: लेखापाल जितेंद्र वाघ, द्वितीय क्रमांक: मुख्य लेखापाल अजयकुमार सांगळे व तृतीय क्रमांक: प्रशांत मेंगाळ यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या सन्मान सोहळ्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या कामाची दखल घेतली गेल्याने कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत 27 ते 29 जानेवारीदरम्यान विश्व मराठी संमेलनाचे आयोजन- मंत्री दीपक केसरकर

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूचे आयपीएस अन्नमलाई यांचे मुंबईत आगमन धारावी भागात जोरदार स्वागत 

vishwatmaklokswamivarta

पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta