vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

     अमरावती, प्रतिनिधी : अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे बडनेरा रेल्वे स्टेशनवर उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केले.

नागपूर येथून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.     बडनेरा रेल्वे स्टेशनवर विदर्भासाठी असलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले. हारफुलांनी सजलेल्या रेल्वेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित मान्यवरांनी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविली.

   यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. बोंडे म्हणाले, विदर्भात वंदे एक्सप्रेसचे स्वागत होत आहे. पुणे येथे जाणाऱ्या चाकरमाण्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सुरक्षित आणि सुसज्ज असा प्रवास होणार आहे. या एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मिळाला आहे, ही आनंदाची बाब आहे. येत्या काळातही सोयीचा आणि गतिमान प्रवास होणार यासाठी प्रयत्न करण्यात येतील

खासदार श्री. वानखेडे म्हणाले, वंदे भारतची दुपारची वेळ प्रवाशांच्या सोयीची नाही. सायंकाळची वेळ असल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होईल. त्यामुळे येत्या काळात रेल्वेचा वेळ बदलण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले

0000

संबंधित पोस्ट

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाणे जिल्ह्यातील “कल्याण” मध्ये संपन्न*

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोयपालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

vishwatmaklokswamivarta