vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जगभर पंतप्रधान नरेंद्र  मोदींची लोकप्रियता सहन न झाल्यानेच कॉंग्रेस चा सीएएला विरोध” केंद्रीय मंत्री रामदास आठवले.

 जगभर पंतप्रधान नरेंद्र  मोदींची लोकप्रियता सहन न झाल्यानेच कॉंग्रेस चा सीएएला विरोध” केंद्रीय मंत्री रामदास आठवले.

नाशिक प्रतिनिधी  : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणलेला नागरिक दुरुस्ती कायदा हा मुस्लिमांच्या अजिबात विरोधात नाही. पंतप्रधान मोदी यांची जगभर वाढती लोकप्रियता कॉंग्रेससह विरोधी पक्षांना सहन होत नसल्यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात रान उठविले जात आहे. नागरिकत्व कायद्यामुळे देशातील मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  येथे केले. श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सभेत वर्धापन दिनानिमित्त सभेत( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले )बोलत असताना म्हणाले की,

या कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही आठवले म्हणाले, की डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे स्थान मोठे आहे. आम्ही हिंदू असून, आम्हाला प्रवेश का नाही, या मागणीसाठी हा लढा होता. त्यामुळे या लढ्याचे प्रत्येक आंबेडकरप्रेमींच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. संविधानाने सर्व धर्मीयांना एकत्र राहण्याची शिकवण दिली आहे. इतर देशांतील पीडित भारतीयांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. मुळात भारत आणि पाकिस्तान हे एकच होते. तेथील अत्याचारित पीडितांना सामावून घेणाऱ्या या कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कुठलाही धक्का लागणार नाही. विरोधकांनी त्याविरोधात राजकारण म्हणून रान उठविले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत निकम यांनी सूत्रसंचालन केले. अमोल पगारे यांनी आभार मानले. नाशिक रोडला राज्यव्यापी अधिवेशन आठवले म्हणाले, की येत्या 17 मेस नाशिक रोडच्या शिखरेवाडी मैदानावर रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. राज्यातील लाखाहून अधिक आंबेडकरप्रेमी कार्यकर्ते या अधिवेशनाला येणार आहेत.

संबंधित पोस्ट

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासहविविध पुरस्कारासाठी ग्रंथालयांनी अर्ज सादर करावेत..

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा,खरीप हंगामासाठी बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांवर पुन्हा अवकळीचे संकट; येत्या 4 दिवसांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता….

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार- योजनेच्या त्रुटी पुर्ततेसाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta