
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्याच्या भाषण संपताच.
मुंबई प्रतिनिधी :स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण संपवून निघाले होते. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला रोखत मोठी दुर्घटना टाळली. मिळालेल्या माहितीनुसार, आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेतकरी जळगावचा आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. रविवारी सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर काही वेळानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.



