vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवानिमित्त  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे; उद्या रेल्वे रोको आंदोलन

गणेशोत्सवानिमित्त  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे; उद्या रेल्वे रोको आंदोलन

 

मुंबई : प्रतिनिधी  :गणेशोत्सवानिमित्त  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना  मागील तीन महिन्यांपासून रेल्वे, एसटीचे  आरक्षण केले होते. त्यानंतर गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असताना चाकरमान्यांना प्रशासनाकडून नवीन नियमावली  जाहिर केली जाते. यात कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना आरटीपीसीआर  निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या प्रशासनाच्या नियमावलीचा चाकरमान्यांनी निषेध केला आहे. आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे, अशी मागणी कोकणवासियांकडून केली जात आहे. परिणामी, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने नवीन नियमावली रद्द करून कोकणात प्रवेश देण्यात यावा. यासाठी 6 सप्टेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याची भूमिका संघटनेच्यावतीने मांडली आहे.

मागील वर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात चाकरमान्यांना जाता आले नाही. त्यामुळे यंदा कोकणात जाण्यासाठी लगबगीने चाकरमान्यांनी तयारी केली होती. त्यासाठी तीन महिन्याच्या अगोदर रेल्वे, एसटीचे तिकिट काढले होते. मात्र, गणेशोत्सव तोंडावर असताना राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्यांसाठी नवीन नियम घातले आहे. सरकारने रेल्वे, एसटीचे आरक्षण करण्याच्यावेळी कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम घालणे आवश्यक होते. आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना नवीन नियम घातल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे. यासाठी 6 सप्टेंबरला रेल्वे रोको आंदोलन करणार आहोत, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल इंडस्ट्री सज्ज महिला सुरक्षेवर आधी भर दिल्याचे आहार  संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

अमृत महा आवास अभियान २०२२-२३ मधील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

माजी लष्करअधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार –‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’*

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त-ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन