vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

अहिल्यानगर, प्रतिनिधी- राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई मार्फत खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मका, बाजरी, रागी, ज्वारी (मालदांडी व संकरीत) या पिकांची खरेदी सुरू करण्यात आली आहे. याची नोंदणी दि. १ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत करता येईल, तर प्रत्यक्ष खरेदी दि. १ मे २०२६ ते ३० जून २०२६ पर्यंत राहील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एच.डी. पवार यांनी दिली आहे.

भरडधान्यांचा हमीभाव खालीलप्रमाणे :

मका २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल, बाजरी २ हजार ७७५ रुपये, रागी ४ हजार ८८६ रुपये, ज्वारी मालदांडी ३ हजार ७४९ रुपये व ज्वारी संकरीत ३ हजार ६९९ रुपये या दराने खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत प्राप्त पीक पेरणीच्या माहितीनुसार मका व ज्वारी खरेदीसाठी विविध खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये अद्याप खरेदीदार संस्था नाहीत, त्या तालुक्यांना जवळील खरेदी केंद्रांशी जोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात अहिल्यानगर तालुक्यासाठी साईकृपा पणन सहकारी संस्था; श्रीगोंदा तालुक्यासाठी संभाजीराजे बहुउद्देशीय सहकारी संस्था (घुटेवाडी), सखुबाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी (घोगरगाव) व श्रीदत्तकृपा पणन सहकारी संस्था मर्यादित (घारगाव); कर्जत तालुक्यासाठी अंध दिव्यांग उद्योजक सेवाभावी संस्था (मिरजगाव); पाथर्डी तालुक्यासाठी अकोले परिसर सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था (अकोले) तर कोपरगाव तालुक्यासाठी बहादराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (रांजणगाव देशमुख) येथे नोंदणी व खरेदी केली जाणार आहे.

तसेच पारनेर, राहाता व राहुरी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना जवळील खरेदी केंद्रांशी संलग्न करण्यात आले असून, श्रीगोंदा केंद्राशी पारनेर, कोपरगाव केंद्राशी राहाता आणि पाथर्डी केंद्राशी राहुरी तालुके जोडण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जवळील खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून आपल्या पिकांची विक्री करावी, असेही कळविण्यात आले आहे.

00000

0

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यात अनुकंपा व लिपिक भरती नियुक्तीच्या 139 आदेशांचे वितरण- शासकीय संस्थांच्या बळकटीकरणाला गती देऊ 

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

नंदुरबार जिल्ह्यात सर्व वाडी, पाडे व गावांना-पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु