vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

जालना, प्रतिनिधी :- भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील मंदिरे, मठ, खाजगी ट्रस्ट आणि वैयक्तिक संग्राहकांकडे असलेल्या जुन्या हस्तलिखितांचे सर्वेक्षण व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यात जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहकांच्या सहकार्याने सुमारे एक कोटीपेक्षा अधिक हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि प्रसार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे.

जालना जिल्ह्यात या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांची ‘जिल्हा नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण केवळ हस्तलिखितांच्या नोंदीसाठी आहे. मूळ हस्तलिखिते मालकाकडून काढून घेतली जाणार नाहीत, तर त्यांचे केवळ शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण केले जाईल. या मोहिमेसाठी खास ‘Gyan Bharatam’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. प्रशिक्षित सर्वेक्षकांमार्फत हस्तलिखितांची पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.

ज्या संस्था किंवा व्यक्तींकडे प्राचीन किंवा जुनी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यांनी या राष्ट्रीय कार्यात प्रशासनास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी https://gyanbharatam.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम प्रसादच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

स्वतः चे घर स्वतः चे ताब्यात “या मोहिमे अंतर्गत२५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश.. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून जिल्हा परिषदेकडील योजनांचा आढावा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक यांची उपस्थिती

बांद्रा कलानगर अरुणोदय वाकस तर्फे ध्वजवंदन पुस्तक प्रकाशन

vishwatmaklokswamivarta