
आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली का?’
मुंबई प्रतिनिधी : दिल्ली आणि मुंबई येथील काही भागांत कट्टरवादी कारवाई करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो. तसंच त्यापैकी काही जणांनी मुंबई लोकलमध्ये रेकी केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अनेक चर्चा असताना अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडल्याचं दिसून येत आहे.
दिल्ली पोलीस येऊन दहशतवादी पकडतात, मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली आहे का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून विचारला. आहे यावर महाराष्ट्र सरकारची प्रतिक्रिया काय येणाऱ्या काळात समजून नाहीतर हा प्रश्नच असणार?



